देशातील शालेय शिक्षणाची स्थिती मांडणारे सर्वेक्षण एन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट (असर) नुकतेच समोर आले. यातील निरीक्षणे गंभीर आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता खालावली असल्याचे त्यातून दिसून येते. विशेषतः आपल्या मातृभाषेतील सोपा परिच्छेद आठवीतील अनेक विद्यार्थ्यांना वाचता येत नाही. सोपी गणिते सोडविता येत नाहीत, अशा अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या. या पार्श्वभूमीवर आपण नेमके कोठे चुकतो आहोत, ही स्थिती सुधारण्यासाठी काय करायला हवे, शाळा, शिक्षक व पालक यांनी या समस्येवर कसा मार्ग काढायला हवा, विशेषतः पालकवर्गाने आता जागे व्हावे म्हणजे नमके काय करावे याची उलगड करण्यासाठी संतोष देशपांडे यांनी संवाद साधला आहे, पुण्यातील अभिनव शाळेच्या विद्यार्थीप्रिय अशा माजी मुख्याध्यापिका व प्रयोगशील मार्गदर्शक विद्याताई साताळकर यांना. विद्याताईंनी आजवर राबवलेल्या उपक्रमांतून आणि त्यातून आलेल्या अनुभवांच्या आधारे या विषयाकडे पालकांची जबाबदारी किती महत्त्वाची आहे यावर सुस्पष्ट भाष्य केले आहे. प्रत्येक सजग पालकाने ऐकायलाच हवा आणि सजग नसलेल्या पालकाला सजग करायला लावणारा असा हा खास पॉडकास्ट जरुर ऐका आणि जास्तीत जास्त पालक, शिक्षक अन् विद्यार्थ्यांपर्यंतही पोहोचवा...मुलांचे भवितव्य बदलण्यासाठी एवढे तर करावेच लागेल..पालकहो, आता जागे व्हावे लागेल!
Podchaser is the ultimate destination for podcast data, search, and discovery. Learn More