देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे हुतात्मे म्हणजे भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव. 93 वर्षांपूर्वी या तिघांना फाशीवर चढविण्यात आले. मात्र, आपल्या बलिदानातून त्यांनी तरुणाईला देशासाठी निधड्या छातीने जगण्याचा मार्ग दाखवला. त्यांच्या बलिदानाचे स्मरण चिरंतन राखण्यासाठी आजही २३ मार्च शहिद दिन म्हणून पाळला जातो. या शहिदांचा एकमेकांमधील पत्रव्यवहार जेव्हा पुढे आला, तेव्हा त्यांच्या मनातील अंतरंगाची, त्यात दडल्या भावनांची हळवी आणि तितकीच ठाम अशी उलगड होते. ती समाजापुढे आणण्यासाठी हरहुन्नरी असे ज्येष्ठ कलाकार सुधीर मोघे यांनी मोठ्या प्रयत्नांतून `शहिदांची पत्रे` नावाने अत्यंत हृद्य असे सादरीकरण करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याचीच उलगड करण्याचा प्रयत्न केला आहे संतोष देशपांडे यांनी. देशप्रेमाचा ओलावा मनात जपतानाच, ध्येयाचा अंगारही फुलविणारी ही शहिदांची पत्रे सर्वांपुढे आलीच पाहिजेत, अशा हेतूने हा संवादही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू या.
Podchaser is the ultimate destination for podcast data, search, and discovery. Learn More